पिंपरी (पुणे)-
अॅट्रॉसिटीचा कायदा ब्राह्मणांनाही लागू करावा. तसेच तो सर्वच जाती आणि धर्म यांच्यासाठी लागू केल्यास कोणीच कोणाला जातीवरून बोलणार नाही, असे प्रतिपादन अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे प्रवक्ते रवीकिरण साने यांनी केले. चिंचवडमधील दर्शन हॉलमध्ये अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने एका विशेष मेळाव्याचे आयोजन केले होते. त्या वेळी ते बोलत होते. या मेळाव्यात ब्राह्मण समाजानेही मोर्चा काढण्याची आवश्यकता व्यक्त केली. या मेळाव्याला ज्येष्ठ साहित्यिक
ह. मो. मराठे, महासंघाचे महासचिव मुकुंद कुलकर्णी आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
via Blogger http://ift.tt/2eVPQxz
from WordPress http://ift.tt/2dNh7Vp
via IFTTT
No comments:
Post a Comment