जळगाव– ज्या तैमूरलंगने १ कोटी ७० लक्ष हिंदूंची हत्या केली, भारताची संपत्ती मोठ्या प्रमाणात लुटून नेली, त्याच्या सैनिकांनी जिहाद म्हणून १ घंट्यात १० सहस्र हिंदूंची हत्या केली, त्या लुटारूचे नाव हिंदी चित्रपट अभिनेता सैफ अली खान याने आपल्या मुलाला ठेवले, हे मोठे षड्यंत्र आहे. हे एकप्रकारे भारताचे ‘इस्लामीकरण’ करण्याचे षड्यंत्र असून ते रोखण्यासाठी हिंदूंमध्ये संघटन करणे आवश्यक आहे. हा देश ‘अखंड हिंदु राष्ट्र’ झाल्यावरच अशा घटनांना आळा बसेल, असे प्रतिपादन भाग्यनगर येथील श्रीराम युवा सेनेचे संस्थापक अध्यक्ष आणि भाजपचे आमदार श्री. राजासिंह ठाकूर यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २५ डिसेंबर या दिवशी येथील शिवतीर्थ, जी.पी.एस्. मैदानावर आयोजित केलेल्या जाहीर हिंदु धर्मजागृती सभेत ते बोलत होते.
या प्रसंगी सनातन संस्थेचे पू. नंदकुमार जाधव, सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र संघटक श्री. सुनील घनवट हेही उपस्थित होते.
via Blogger http://ift.tt/2i1z5Ez
from WordPress http://ift.tt/2hhZCti
via IFTTT
No comments:
Post a Comment