Latest News

श्रीकृष्ण हायस्कूल तर्फे दहावी-बारावीच्या विद्याथ्र्यांना निरोप



चांदूर रेल्वे / शहेजाद खान /-

आमला विश्वेश्वर येथील श्रीकृष्ण हायस्कूल  व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने दहावी,बारावी
कला व एचएससी व्होकेशनलच्या विद्याथ्र्यांना निरोप देण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य सुरेश देवळे,प्रमुख पाहूणे म्हणून पर्यवेक्षिका भारती
अवधुतकर, प्रा.प्रसेनजित तेलंग, प्रतिभा ठाकरे, प्रा.संजय राऊत उपस्थित होते. यावेळी उत्कर्ष
राऊत, ऋतुजा भोपे, दिशा बकाले,नमिका श्रीखंडे, सैय्यद समीर सै.रहेमत, भाग्यश्री मेत्रे,
भूमिका काळमेघ,स्नेहल जुमडे, उमेश सुर्यवंशी, अमित शेलोकार या विद्याथ्र्यांनी आपल्या
भावना व्यक्त केल्या. प्रा.प्रसेनजित तेलंग, भारती अवधुतकर यांनी विद्याथ्र्यांना मार्गदर्शन
केले. प्राचार्य देवळे यांनी मानसीक दडपन येवु न देता वेळेचे नियोजन करीत परीक्षेला सामोरा
जा असे सांगीतले. यावेळी दहावी व बारावीच्या विद्याथ्र्यांनी शिक्षकांना भेटवस्तु देऊन
त्यांचा सन्मान केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक तायडे, संचालन वर्ग नववीचे विद्यार्थी अमोल शिंदे व अथर्व
मालवे यांनी केले. आभार ऋषीकेश कुबडे यांनी मानले. यावेळी सर्व शिक्षक व वर्ग ९ ते १२
वी चे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

via Blogger http://ift.tt/2mU6zUF




from WordPress http://ift.tt/2mjitdD
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.