अमरावती /-
आपल्या अनोख्या आंदोलनातून नेहमी जनतेच्या विविध मागण्या सोडवण्यासाठी आमदार श्री बच्चू भाऊ कडू प्रसिद्ध आहेतच … अशातच आता उद्या अमरावती येथे अनोखे “नांगर आंदोलन” ठेवण्यात आले आहे
अमरावती येथी विभागीय आयुक्त कार्यालय येथे हे अनोखे आंदोलन होणार असून जील्यातून अनेक शेतकरी यात सहभागी होणार आहेत. यात प्रमुख मागण्या म्हणजे
- संत्रा ,तूर,सोयाबीन,कापूस धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी ५०००० रुपये मदत करा
- पिक कर्जाचा रकमेत वाढ करा
- विधवा अपंग व दुर्धर आजार असणाऱ्यांना प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये थेट समविष्ट करावे तसेच अंत्योदय योजने अंतर्गत कार्ड देऊन त्यांचा मानधनात वाढ करावी
- पेरणी ते कापणी ची सर्व कामे MREGS च्या अंतर्गत करावी
- शेतकऱ्यांना स्वामिनाथन आयोग त्वरित लागू करावा
- शेत मजुरांना अपघात व आरोग्य विमा त्वरित द्यावा
- मायक्रो फायनान्स कंपन्यांची वसुली त्वरित बंद करावी
या व अशा इतर मागण्यांसाठी उद्या हे अनोखे आंदोलन होणार आहे
via Blogger http://ift.tt/2iDmw0I
from WordPress http://ift.tt/2iDnoCo
via IFTTT
No comments:
Post a Comment