सांगली –
संजय साडविलकर हे गुन्हेगार असून त्यांनी अवैधरित्या शस्त्रे बाळगून गुन्हे केल्याची स्वीकृती विशेष अन्वेषण पथक (एस्आयटी) आणि न्यायाधीश यांच्यासमोर दिली आहे. त्यामुळे या स्वीकृतीच्या आधारे संजय साडविलकर यांच्या अवैध शस्त्र विक्री प्रकरणाचे अन्वेषण करण्याविषयी न्यायालयाने पोलिसांना आदेश द्यावा, असा युक्तीवाद सनातनचे अधिवक्ता श्री. समीर पटवर्धन यांनी ६ जानेवारी या दिवशी कवठेमहांकाळ (जिल्हा सांगली) येथील न्यायालयात केला. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्री. प्रवीण नवले यांनी संपूर्ण युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर या खटल्याची पुढील सुनावणी १३ जानेवारीला ठेवली आहे.
घटनाक्रम असा…
संजय साडविलकर यांच्या विरोधात कवठेमहांकाळ येथील सौ. आशाताई पोतदार यांनी पोलीस ठाण्यात २९ ऑक्टोबर २०१६ या दिवशी तक्रार केली होती; मात्र पोलिसांनी या तक्रारीची नोंद न घेतल्याने सांगलीचे पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्याकडे २१ नोव्हेंबर २०१६ या दिवशी तक्रार प्रविष्ट केली होती. तरीही पोलिसांनी या प्रकरणी कोणतीही कार्यवाही न केल्यामुळे १३ डिसेंबर २०१६ या दिवशी कवठेमहांकाळ येथील न्यायालयात संजय साडविलकर यांच्या विरोधात याचिका प्रविष्ट करण्यात आली.
अधिवक्ता समीर पटवर्धन युक्तीवाद करतांना म्हणाले की,
१. डॉ. दाभोलकर आणि कॉ. पानसरे हत्या प्रकरणे ही महाराष्ट्रातील संवेदनशील अन् गाजलेली प्रकरणे आहेत. १६ फेब्रुवारी २०१५ या दिवशी कॉ. पानसरे यांची हत्या झाल्यानंतर या प्रकरणी सनातनचे साधक श्री. समीर गायकवाड यांना ऑक्टोबर मासात अटक झाली होती.
२. त्यानंतर सनातनचे साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना अटक करण्याची प्रक्रिया चालू असतांनाच एक दिवस आधी संजय साडविलकर यांनी प्रसारमाध्यमांसमोर डॉ. तावडे यांना ओळखतो, असा जबाब एस्आयटीच्या शपथेवर नोंदवला आहे.
३. या जबाबात साडविलकर यांनी वर्ष १९८५ ते १९८८ या कालावधीत माझ्याकडे दुसरा व्यवसाय नसल्याने मी उदरनिर्वाहासाठी गावठी रिव्हॉल्व्हर खरेदी-विक्रीचे काम करत होतो. त्यामुळे मला रिव्हॉल्व्हर बनवणे आणि दुरुस्त करणे याची माहिती होती, अशी माहिती स्वतःहून एस्आयटीला दिली आहे. याचा अर्थ संजय साडविलकर हे अवैध शस्त्र विक्रीचे गुन्हे करत होते, हेच सिद्ध होते.
४. त्यामुळे या कबुलीजबाबाच्या आधारे संजय साडविलकर आणि संगनमत करून विकणारे सर्व गुन्हेगार अन् साथीदार कोण ? त्यांनी शस्त्रे कोणाला विकली ? किती गुन्हे घडले ? आदी गुन्ह्यांचे अन्वेषण होणे हे समाजाच्या दृष्टीने आवश्यक आहे.
५. सौ. आशाताई पोतदार यांनी प्रविष्ट केलेल्या तक्रारीची नोंद न घेतल्याने कवठेमहांकाळ येथील न्यायालयात तक्रार नोंदवण्यात आली आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून फौजदारी आचारसंहिता १५६(३) प्रमाणे या गुन्ह्याचे अन्वेषण करण्यासाठी न्यायालयाने पोलिसांना आदेश द्यावा, अशी विनंती करत आहोत.
via Blogger http://ift.tt/2j0v3ul
from WordPress http://ift.tt/2iNZBQo
via IFTTT
No comments:
Post a Comment