तालुक्यातील येलदरी येथे वाहनांच्या धडकेत निळा ध्वजाचा ओटा तुटून ध्वज खाली पडल्याने वाहनातून प्रवास करत असलेल्या पाच वारकरी संतांना समाजकंटकांनी अमानुष मारहाण करून त्यांच्या तोंडाला काळे फासले. तसेच उठाबशा काढण्यास भाग पाडले. ६ जानेवारी या दिवशी सकाळी ११.३० वाजता ही घटना घडली. संतांना मारहाणीच्या निषेधार्थ दुपारी ४ नंतर हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि ग्रामस्थ यांच्याकडून जिंतूर बंद करण्यात आले, तर दुसर्या दिवशी जमावाकडून ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आली.
या वेळी पोलिसांकडून लाठीमार करण्यात आला. उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कांबळे यांना निलंबित करण्याची मागणी करण्यात आल्यावर त्यांचे स्थानांतर (बदली) करण्यात आले. या प्रकरणी अद्यापपर्यंत १६ समाजकंटकांना अटक करण्यात आली, असे पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांनी सांगितले.
via Blogger http://ift.tt/2jiQgyO
from WordPress http://ift.tt/2itr0WP
via IFTTT
No comments:
Post a Comment