मोईन खान /सैय्यद मुजीबोद्दीन
यवतमाळ :-
जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी जिल्ह्यात मुंबई पोलिस अधिनियमातील तरतुदीनुसार प्रतिबंध आदेश लागू करण्यात आले आहे. या आदेशानुसार जिल्ह्यात 7 जानेवारीपर्यंत जमावास बंदी राहणार आहे.
या आदेशान्वये जिल्ह्यात जमाव करणे, शस्त्र बाळगणे, माणसांचे एकत्रिकरण व पुतळ्याचे प्रदर्शन करणे आदी प्रकारांवर बंदी घालण्यात आली आहे. या कलमाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द मुंबई पोलिस कायदा 1951 च्या कलम 37 (1) (3) नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हादंडाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी कळविले आहे.
via Blogger http://ift.tt/2iL7wNY
from WordPress http://ift.tt/2iE2O7y
via IFTTT
No comments:
Post a Comment